शनिवार, 8 दिसंबर 2018

Buddha Teaching

             तथागत बुद्धाने काय स्वीकारले.
....................................................................

*1. माणसाचे मन हे प्रचंड शक्तिमान आहे.*

*2 . मनाची शुध्दता व अशुद्धता हिच सुख दुःखाचे मुख्य कारण आहे.*

*3. मनावर जसे संस्कार करावे तसे होऊ शकतात  (चांगले/ वाईट)*

*4. मनाला मेडिटेशन(ध्यान) द्वारा निर्मळ , नितळ व शुद्ध बनवले जाऊ शकते.*

*5. व्यक्तीच्या सुख दुःखाला तोच मुख्यता जबाबदार असतो. (इतर केवळ मार्गदर्शक असू शकतात.)*

*6. व्यक्तीला या जन्मातच दुःख मुक्त होता येते.*

*7. जगात कारणाशिवाय काहीच घडत नाही.*

*8. जसे कारण तसाच परिणाम होतो.*

*9. विकारयुक्त मनच शारीरिक मानसिक दुःख निर्माण करते.*

*10. मनाची शुद्धता,  निर्मलता हा बुद्ध धम्माचा मूळ केंद्रबिंदू आहे.(कारण त्यातच सुख दडले आहे).*

*11. विश्वात सर्व काही अनित्य आहे, परिवर्तनशील आहे.*

*12. मूर्खापासून संगत करण्यापेक्षा एकटे राहावे.*

*13. क्रोध हा अग्नी आहे, तो मनुष्यमात्राला जाळतो.*

*14. वैराने वैर कधीच मिटत होत नाही ते अवैरानेच मिटते.*

*15. अष्टांगिक मार्गाने जगणे हाच बुद्धाचा श्रेष्ठ धम्म आहे.*

*16. अरहंत पद,  संबोधी,  बुद्धत्व,  निब्बान मानवी जीवनातील सर्व श्रेष्ठ अवस्था आहेत.*

*17. बुद्ध धम्म हा नैसर्गिक सत्यावर आधारलेला एकमेव धम्म आहे.*

*18. कोणतीही गोष्ट जर विचार,  तर्क व विवेकाच्या कसोटीवर सिद्ध होत नसेल तर ती स्वीकारू नये.*

*19. आळस,  अनैतिकता,  दूराचार,  द्वेष,  अहंकार,  घृणा,  तिरस्कार,  आसक्ती,  लोभ हेच व्यक्तिच्या सर्वनाशाला कारण ठरतात.*

*20.मनातिल विकार  (मी व माझे प्रती आसक्ती,  क्रोध द्वेष, इर्षा, अहंकार)  नष्ट केल्यास आपण सर्व श्रेष्ठ सुख प्राप्त करु शकतो.*
   

*!! भवतु सब्ब मंगलम् !!*

       *" बुध्दं सरणं गच्छामि "*
       *" धम्मं सरणं गच्छामि "*
        *" संघं सरणं गच्छामि  "*

              !! मंगलमय सप्रेम जयभिम !!

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ