रविवार, 25 अक्टूबर 2020

64 वी विजयादशमी

🙏सम्राट अशोक विजया दशमीच्या 64 व्या धम्मचक्र  प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने समस्त भारतीयांना  मंगलमय सदिच्छा.🙏

👉तथागत भगवान गौतम बुद्धांनी इ.स. पूर्व 528 च्या आषाढ पौर्णिमेला सारनाथ येथे केले. त्यांनी कौंडिण्य, वप्प, भद्दीय, अश्वजित आणि महानाम या पाच परिव्रजकांना धम्माचे सार म्हणजे विशुद्धीमार्ग सांगून पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले.
आपल्या राज्याभिषेकाच्या ८व्या वर्षी इ.स. पूर्व 261 मध्ये सम्राट अशोकाने कलिंग देशावर आक्रमण केले. तेराव्या शिलालेखानुसार कलिंग युद्धात 1 लाख 50 हजार लोकांना बंदी करुन निर्वासित केले गेले. जवळपास 1 लाख लोकांची हत्या झाली. नर संहार अशोकाने स्वतःच्या डोळ्याने पाहिला. त्याचे मन उद्विग्न झाले. अशांत झाले. त्याने तथागत भगवान बुद्धांचा शांती, दया आणि करुणेच्या मार्गाचा बौद्ध धम्माचा स्वीकार केला. दीपवंश आणि महावंश या ग्रंथामध्ये अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या 14 व्या वर्षी निग्रोध नावाचा भिक्षूकडून धम्म दीक्ष घेतली. त्यानंतर मोगलीपुत्त तिस्स च्या प्रभावाने अशोक पूर्ण बौद्ध झाले. त्यांना दीक्षित करण्याचे सर्व श्रेय उपगुप्त भंतेंना जाते. असे नमुद करण्यात आले आहे.
कलिंग देशावरील विजयाच्या 10 व्या दिवशी अशोकाने धम्म दीक्षा घेतली. त्या दिवसाला जगाच्या इतिहासामध्ये “अशोका विजया दशमी” म्हटले जाते. सम्राट अशोका सोबत जवळपास 80 हजार लोक होते. 
हे दुसरे धम्मचक्र प्रवर्तन.
त्यानंतर जवळपास 2216-17 वर्षांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागभूमित, नाग नदीच्या काठी, नागपूर येथे अशोका विजयादशमी दिनी म्हणजे 14 ऑक्टोबर,1956 रोजी आपल्या 5 लाख अनुयायासह रक्ताचा एकही थेंब न सांडता तथागतांचे धम्मचक्र आसासह फिरवून न भूतो न भविष्यती अशी जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती केली. आम्हाला माणूस बनविले. स्वाभिमानाचे जगणे बहाल केले. आम्ही माणूस झालो या क्रांतीला 64 वर्षे झाली.
हे तिसरे धम्मचक्र प्रवर्तन.
14 ऑक्टोबर,1956 रोजीच्या धम्मदीक्षा सोहळा पार पडला या सम्राट अशोक विजया दशमीच्या 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व भारतीयांना मंगलमय सदिच्छा🙏🙏🙏

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ